“इंदापूर : “लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क हा केवळ अधिकार नसून ते प्रत्येक सुजाण नागरिकाचे पवित्र कर्तव्य आहे. आपण कोणाला मतदान करतो यापेक्षाही, आपण मतदान प्रक्रियेत सहभागी होणे हे लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज केले.

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती, इंदापूर पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने बोराटेवस्ती, भरणेवाडी येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.मतदानाचा हक्क बजावून दिला संदेशआज सकाळपासूनच इंदापूर तालुक्यात निवडणुकीचा उत्साह पाहायला मिळत होता. मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सकाळीच आपल्या निवासस्थानाहून निघून बोराटेवस्ती येथील मतदान केंद्रावर रांगेत उभे राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. एका जबाबदार लोकप्रतिनिधीच्या रूपात त्यांनी सामान्य नागरिकांप्रमाणेच नियमांचे पालन करत मतदान केले, ज्याचे परिसरात कौतुक होत आहे.

लोकशाहीचा उत्सव आणि लोकसहभागयावेळी बोलताना भरणे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा पाया आहेत. गावच्या आणि तालुक्याच्या विकासाची धुरा कोणाच्या हातात द्यायची, याचा निर्णय घेण्याचा आजचा दिवस आहे. इंदापूरच्या प्रगतीसाठी आणि विकासाची गती कायम राखण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदानाचा टक्का बाजवाला, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.मतदान केंद्रावर यावेळी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनाबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.











