पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी होणार मदत
सोलापूर : ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी आणि सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी दि.८ मार्च ते २२ दि.२२ मार्च २०२६ या दरम्यान जिल्हयात सर्व ग्रामपंचायत स्तरावर ‘जल महोत्सव’ राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.

याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले, नदी उत्सवाच्या धर्तीवर जल उत्सवाची परंपरा विकसित करण्याच्या गरजेवर भर दिला होता.या दृष्टिकोनावर आधारित, राष्ट्रीय पेयजल विभाग, केंद्र शासन व नीती आयोगाच्या सहकार्याने २०२४ मध्ये २० महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये जल उत्सव प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आला होता.आता जल महोत्सव देशभर राबविण्यात येणार आहे.ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या योजना, स्टँड पोस्ट नळ पाणीपुरवठा योजना तसेच दरडोई किमान ४० लिटर प्रतिदिनने पूर्ण झालेल्या योजनांची दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन प्रमाणे सुधारणात्मक पुनर्जोडणी करण्यात येत आहे.

जिल्हयातील शाळा, अंगणवाड्या, अनुदानित आश्रमशाळा आणि शासकीय वसतिगृहांसाठी या योजनेतून नळजोडणी देण्यात येत आहे.एकाकी/आदिवासी वाडी-पाड्यांसाठी सौरऊर्जा आधारित नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत.जल महोत्सव जिल्हा , तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर अशा तीन स्तरांवर आयोजित करण्यात येणार आहे.गाव आणि पंचायत समिती स्तरावर ‘लोकजल उत्सव’ आयोजित केला जाईल, जो पूर्णपणे लोकसहभागावर आधारित असेल.गावात ग्रामसभा आणि पाणी समितीद्वारे प्रत्यक्ष कृतींवर भर दिला जाणार आहे.महिलांद्वारे जल गुणवत्ता चाचणी (फिल्ड टेस्टिंग किट वापरून) केली जाणार आहे.लोकप्रतिनिधी आणि नागरिक आपल्या गावातील जलस्रोतांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेणार आहेत.

जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि स्वच्छता केली जाणार आहे.पाणी पुरवठा योजनांचे औपचारिक हस्तांतर आणि सामुदायिक शपथ दिली जाणार आहे.ग्रामपंचायत विकास आराखड्यात पाण्याचा समावेश केला जाणार आहे.
सामुदायिक जीवनामध्ये खोलवर रुजलेली एक महत्वाची बाब आहे.ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा आधिक शाश्वत आणि मजबूत करण्यासाठी सामुदायिक लोकसहभाग वाढवण्यासाठी दि. ८ ते २२ मार्च २०२ या कालावधीत जलमहोत्सव राबवला जाणार आहे.–अमोल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता )










