सुरक्षेसाठी सीसीटीव्ही : देवीला आवडणाऱ्या नागवेलीच्या पानांनी सजवून तांदळावर महापूजा मांडण्यात येणार
येरमाळा । कुलस्वामीनी आई श्री तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण मानल्या जाणाऱ्या श्री महोत्सवाला बुधवारपासून सुरुवात झाली. महाराष्ट्रासह इतर राज्यांतून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येरमाळा नगरीत दाखल होत आहेत, यात्रेतील मुख्य चुनखडी वेवण्याचा विधी आज असल्याने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. येडेश्वरी देवी मंदिरात चैत्र पौर्णिमा यात्रा पौर्णिमेनिमित्त देवीला नागवेलीच्या पानांनी सजवून तांदळावर महापूजा मांडण्यात येणार आहे. रात्री नऊ वाजता मुख्य मंदिर डोंगरावर हलगी-नगाऱ्यांच्या गजरात मानकरी, देवस्थान समितीचे पदाधिकारी, खदिकरी, आराधी आणि आहे. त्यानंतर देवीची पालखी व गोंधळी यांच्या उपस्थितीत महाआरती होणार काढण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी देवस्थान समितीने व्यापक नियोजन केले आहे. दर्शनरांगा, पिण्याच्या पाण्याची सोय, सुमारे तीन लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या, आरोग्य उपकेंद्र, ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.


परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त
यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान पोलिस बंदोबस्तासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक १५, पोलिस उपनिरीक्षक ५०, पुरुष पोलिस ४००, महिला २००, होमगार्ड ५०० असा तगडा पोलिस बंदोबस्त राहणार आहे. यामुळे होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसणार आहे.
यात्रेत खाऊ, अन् खेळणीची दुकाने
मंदिर परिसरात आणि आमराई मंदिर परिसरात विविध स्टॉल लावण्यात आले आहेत. हॉटेल, ज्यूस, कोल्ड्रिंक्स, आइस्क्रीम, फळे, प्रसाद, दागिने, खेळणी तसेच मनोरंजनासाठी रहाट पाळणे, मौत का कुंआ, ब्रेकडान्स, झुले आदी आकर्षणे भाविकांना खुणावत आहेत. आज सर्वत्र भक्तांची दाटी होईल.
उद्या पालखी आमराई मंदिराकडे..
यात्रा महोत्सवाच्या दिवशी देवीची पालखी मुख्य मंदिरातून आमराई मंदिराकडे प्रस्थान करते. चुन्याच्या रानातून जाणाऱ्या या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. पाच दिवस आमराई मंदिरात मुक्काम असते. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन आमराई मंदिर परिसरात दर्शन रांगेतील नियंत्रणासाठी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.
भाविकांनी टाकल्या राहुट्या
चैत्र पौर्णिमा व चुनखडी वेचणे या मुख्य कार्यक्रमासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक कुटुंबासह बेरमाळ्यात दाखल झाले आहेत. त्यांनी राहुट्या टाकल्या आहेत. मंदिर परिसरातच अनेक भाविकांनी गॅस टंचाईकडे दुर्लक्ष करून आजूबाजूच्या परिसरातील लाकूड-काठक्या गोळा करून चुलीवर स्वयंपाक करताना दिसून येत आहेत.









