Saturday, December 6, 2025
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शालेय जीवनापासून समाज सुधारण्याचे कार्य झाले पाहिजे – राज्यपाल हरीभाऊ बागडे

राजेश भोई by राजेश भोई
November 17, 2025
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शालेय जीवनापासून समाज सुधारण्याचे कार्य झाले पाहिजे – राज्यपाल हरीभाऊ बागडे
0
SHARES
4
VIEWS

पंढरपूर, “समाज सुधारण्याचे कार्य शालेय जीवनापासूनच सुरू झाले पाहिजे आणि या प्रक्रियेत पत्रकारांनी सक्रिय योगदान द्यावे,” असे आवाहन राजस्थानचे राज्यपाल मा. हरीभाऊ बागडे यांनी केले. पंढरपूर येथे व्हॉइस ऑफ मीडिया व व्ही ओ एम नॅशनल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार कार्यशाळेत ते मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमास व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रमुख संदीप काळे, उद्योजक राणा सूर्यवंशी, वरिष्ठ पत्रकार संजय आवटे,इस्कॉन पंढरपूर अध्यक्ष प्रल्हाद प्रभू, श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज, इस्कॉन सिकंदराबादचे अध्यक्ष सहदेव प्रभू यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पत्रकार उपस्थित होते.

राज्यपाल बागडे यांनी भारतीय संस्कृतीच्या नैतिक मूल्यांचा गौरव करताना सांगितले की, “प्राचीन व मध्ययुगीन इतिहासकार, अभ्यासक आणि परकीय प्रवासी यांच्या लेखनातून भारतीय संस्कृती समृद्ध आणि नैतिक मूल्यांनी युक्त होती. इंग्रजांनी १८३५ मध्ये गुलामगिरी निर्माण करणारी शैक्षणिक पद्धती आणून या मूल्यांवर घाला घातला. मात्र, २०२० पासून केंद्र शासनाने शैक्षणिक धोरणात अमूलाग्र बदल करून नवसंस्कारित दिशा दिली आहे.” पत्रकारांच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना त्यांनी नारद मुनी यांचा उल्लेख ‘पहिले पत्रकार’ म्हणून केला आणि सांगितले की, “राष्ट्र, राज्य, शहर आणि गावाच्या विकासात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. विकासात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारांनी काम केल्यास समाजात सकारात्मक बदल घडतो.”

राज्यपालांनी प्रसारमाध्यम क्षेत्रातील विविध उदाहरणांचा दाखला देत पत्रकार समाज सुधारण्याच्या कार्यात कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात याचे विवेचन केले. त्यांनी नालंदा विद्यापीठाच्या आयुर्वेद शाखेचे उदाहरण देत प्राचीन भारतातील संशोधन वृत्ती आणि शिक्षणपद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले. इंग्रजांच्या काळात गव्हर्नर मेकॉले यांच्या शैक्षणिक धोरणामुळे भारतीय मूल्यांवर परिणाम झाला, असेही त्यांनी नमूद केले. “पत्रकार समाजाचा आरसा असून, जनतेचे मत आणि गरजा राजकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य ते करतात,” असे सांगून त्यांनी व्हॉईस ऑफ मीडिया संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.


कार्यक्रमात राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान मा. राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अनिल मस्के यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात व समारोपही राष्ट्रगीताने करण्यात आला.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यात आजपासून २ डिसेंबर दरम्यान कुष्ठरुग्ण अभियान राबविण्यार.. !

Next Post

हत्तुरे वस्ती येथे नियोजित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन संपन्न.

Related Posts

सीएसआर फंडातून माध्यमिक शिक्षण विभागाला पाच संगणक भेट
सोलापूर शहर

सीएसआर फंडातून माध्यमिक शिक्षण विभागाला पाच संगणक भेट

November 29, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या अक्कलकोटमध्ये; जाहीर सभेचे आयोजन
राजकारण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या अक्कलकोटमध्ये; जाहीर सभेचे आयोजन

November 29, 2025
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छ शौचालयाबद्दल आगार व्यवस्थापक निलंबित!
सोलापूर शहर

सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छ शौचालयाबद्दल आगार व्यवस्थापक निलंबित!

November 29, 2025
सावकाराच्या तगाद्याने इसमाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी मोबाईलमध्ये व्हिडिओ केला रेकॉर्ड
क्राईम

सावकाराच्या तगाद्याने इसमाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी मोबाईलमध्ये व्हिडिओ केला रेकॉर्ड

November 29, 2025
तिहेरी घरफोडी करणाऱ्या दोन आंतरराज्य गुन्हेगारांना अटक
क्राईम

तिहेरी घरफोडी करणाऱ्या दोन आंतरराज्य गुन्हेगारांना अटक

November 29, 2025
दुचाकीच्या व्हीआयपी नंबरसाठी सोलापूर आरटीओला मिळाले १९ लाख
सोलापूर शहर

दुचाकीच्या व्हीआयपी नंबरसाठी सोलापूर आरटीओला मिळाले १९ लाख

November 27, 2025
Next Post
हत्तुरे वस्ती येथे नियोजित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन संपन्न.

हत्तुरे वस्ती येथे नियोजित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025