सोलापूर : २३ फेब्रुवारी २०२६ महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील ७ जिल्ह्यांसाठी ‘मध्यम स्वरूपाच्या पावसाचा’ इशारा जारी करण्यात आला आहे. आज, २३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७:०० वाजल्यापासून हा इशारा लागू झाला असून, पुढील ३ तासांत हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बीड, धाराशिव, हिंगोली, लातूर, नांदेड, परभणी आणि सोलापूरसह . पुढील ३ तासांत या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. पावसासोबतच ताशी ३० ते ४० कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.हा इशारा आज रात्री १०:०० वाजेपर्यंत प्रभावी राहील. अशी माहिती हवामान वेधशाळेने वर्तवले आहे
नागरिकांसाठी आवाहन: प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजांचा कडकडाट होत असताना झाडाखाली आश्रय घेऊ नये, तसेच शेतीकामात असलेल्या नागरिकांनी आणि पशुपालकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वाहन चालवताना वाऱ्याच्या वेगाचा अंदाज घेऊन सावधगिरी बाळगावी.










