Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

दक्षिण अफ्रिकेनं २५ वर्षानंतर भारतात कसोटी मालिका जिंकली; टीम इंडियाचा 408 धावांनी पराभव

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
November 26, 2025
in Sports
0
दक्षिण अफ्रिकेनं २५ वर्षानंतर भारतात कसोटी मालिका जिंकली; टीम इंडियाचा 408 धावांनी पराभव
0
SHARES
1
VIEWS

गुवाहाटी : भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारतासमोर विजयासाठी ५४९ धावांचे आव्हान होते. मात्र दुसऱ्या डावात भारतीय संघ १४० धावांपर्यंतच मजल मारू शकला. दक्षिण अफ्रिकेनं दुसरा सामना तब्बल ४०८ धावांची जिंकत २- ० अशी मालिका खिशात घातली. भारताचा हा कसोटी इतिहासातील आतापर्यंतचा धावांच्या बाबतीतला सर्वात मोठा पराभव ठरला.

भारताला व्हाईट वॉश देत दक्षिण अफ्रिकेनं भारतात तब्बल २५ वर्षानंतर कसोटी मालिका जिंकली. याचबरोबर भारताचा हा सेना (SENA) देशांविरूद्धचा मायदेशातील सलग पाचवा पराभव ठरला. यापूर्वी न्यूझीलंडनं भारताला मायदेशात ३-० अशी मात दिली होती. गुवाहाटी इथं खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचं झालं तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण अफ्रिकेनं पहिल्या डावात ४८९ धावांचा डोंगर उभारला होता. यानंतर त्यांनी टीम इंडियाचा पहिला डाव २०१ धावात गुंडाळला. दक्षिण अफ्रिकेनं भारताला फॉलो ऑन न देता २६० धावा करत आपला डाव घोषित केला. यामुळं भारतासमोर विजयासाठी ५४९ धावांचे मोठं आव्हान उभं राहिलं.

सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाची अवस्था २ बाद २७ अशी झाली होती. त्यानंतर पाचव्या दिवशी टीमचा टिकाव लागेल याची शक्यता फार नव्हतीच. पाचव्या दिवशी सिमॉन हार्मेरच्या भेदक माऱ्यासमोर उरल्या सुरल्या टीम इंडियानं देखील नांगी टाकली. त्यानं २३ षटकात ३७ धावा देत सहा विकेट्स घेतल्या. भारताकडून दुसऱ्या डावात रविंद्र जडेजाने ५४ धावा करत एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र केशव महाराजने त्याची ही झुंज संपवली. महाराजने दुसऱ्या डावात दोन विकेट्स घेतल्या.

Previous Post

नांदणी येथील महाराजा डान्स बारवर छापा’ मंद्रूप पोलिसांनी केली कारवाई..!

Next Post

संविधान दिनानिमित्त ९ नवीन भाषांमध्ये संविधान प्रकाशित; राष्ट्रपती म्हणाल्या,देशाची आर्थिक एकता मजबूत

Related Posts

क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीला राष्ट्रीय बाल पुरस्कार; वीर बाल दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते 20 मुलांचा सन्मान
Sports

क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीला राष्ट्रीय बाल पुरस्कार; वीर बाल दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते 20 मुलांचा सन्मान

December 26, 2025
Next Post
संविधान दिनानिमित्त ९ नवीन भाषांमध्ये संविधान प्रकाशित; राष्ट्रपती म्हणाल्या,देशाची आर्थिक एकता मजबूत

संविधान दिनानिमित्त ९ नवीन भाषांमध्ये संविधान प्रकाशित; राष्ट्रपती म्हणाल्या,देशाची आर्थिक एकता मजबूत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025