सोलापूर: “शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून तो राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क सांगणारा नागरिक आहे. वचननाम्यातील प्रत्येक आश्वासन पूर्ण करणे ही आमची जबाबदारी असून, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन शिवसेनेच्या वतीने वळसंग येथे आयोजित जाहीर सभेत करण्यात आले. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, वळसंग येथील शंकरलिंग देवस्थान मैदानावर ही भव्य सभा संपन्न झाली.

महत्त्वाचे घोषणा म्हणजे पाणी आणि वीज प्रश्न: दुष्काळग्रस्त भागातील प्रत्येक गावापर्यंत उजनी धरणाचे पाणी पोहोचवणार असून, वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. एनडीआरएफचे (NDRF) निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना ३२ हजार कोटींचे पॅकेज दिले आहे. मदतीची मर्यादा २ हेक्टरवरून ३ हेक्टरपर्यंत वाढवली असून, कर्जमाफीसाठी कमिटी गठीत केली आहे. योग्य वेळी कर्जमाफी होणारच, असा शब्द यावेळी देण्यात आला. हरणा नदीवरील पुलाचा प्रश्न मार्गी लावला असून, पितापूर-ओरई आणि पितापूर-दर्शन मार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणासाठी २.५ कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील सोलर प्रकल्पातून शेतकऱ्यांना मिळणारा ३५ हजार रुपयांचा मोबदला आता ५० हजार रुपये प्रति एकर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. असे ही ते मन्हाले.सभेत बोलताना विरोधकांना स्पष्ट इशारा देण्यात आला की, “इथे कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही शिवसैनिक आहोत, कोणाच्या नादाला लागत नाही आणि आमच्या नादाला कोणी लागू नये.
कायदा व सुव्यवस्था राखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.”या सभेला शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, संपर्कप्रमुख महेशनाना साठे, जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, माजी शहरप्रमुख मनिष काळजे, स्थानिक पदाधिकारी, शिवसेनेचे उमेदवार आणि मोहोळ तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










