नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी पेपरफुटीच्या मुद्द्यावर आपली दुसरी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, “धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. सरकार त्यांचे मंत्रिमंडळ बदलण्याचा विचार करत आहे, पण आम्ही तसे होऊ देणार नाही.” राहुल गांधी म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या तीन मागण्या आहेत ज्यावर कोणतीही तडजोड होणार नाही. पहिली मागणी ही आहे की, शिक्षणमंत्री, जे भ्रष्ट, अकार्यक्षम आणि या पदासाठी अयोग्य आहेत, त्यांना त्यांच्या पदावरून हटवावे.” आणि नरेंद्र मोदी भारताचा भूतकाळ आहेत ते भविष्याशी लढू शकत नाही असेहि राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.
“धर्मेंद्र प्रधान यांचं शिक्षण खातं बदलून त्यांना दुसरीकडे हलवणं हे विद्यार्थ्यांना अजिबात मान्य नाही. मिस्टर प्रधान यांना हटवलचं पाहिजे असं राहुल गांधी म्हणाले. काल मी तुम्हाला दाखवलं एका मुलाला गोळी मारली. लाठी चार्जमध्ये हजारो मुलांची डोकी फुटली. पॅलेट मुलांच्या शरीरात आहेत. ज्यांनी कोणी केलं त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या सगळ्याचा नेता नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी” अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.