No Result
View All Result
पंढरपूर : आषाढी वारीदरम्यान चंद्रभागा नदीत स्नानासाठी उतरलेल्या नांदेड जिल्ह्यातील तीन वारकऱ्यांचा जीव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सतर्क बचाव पथकाने वाचवला. सोमवारी सकाळी ४ नंबर हायमास्ट पोलजवळ पोहत असताना दम लागल्याने तिघेही पाण्यात बुडू लागले.
नदीत गस्त घालणाऱ्या बचाव पथकाने प्रसंगावधान राखत तात्काळ पाण्यात उडी घेत तिघांनाही सुखरूप बाहेर काढले. बचाव करण्यात आलेल्या वारकऱ्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातील सुरज भारती, गणेश भोकरे आणि सतीश भोकरे यांचा समावेश आहे. घटनास्थळीच प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाने सांगितले.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीपात्रात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची यंत्रणा २४ तास सज्ज ठेवण्यात आली आहे. नदीत १७ रेस्क्यू बोटी, १८० ‘आपदा मित्र’ आणि प्रशिक्षित बचावकर्मी तैनात असून सतत गस्त सुरू आहे. नदीत स्नान किंवा पोहताना प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी केले आहे.
No Result
View All Result