अक्कलकोट: अक्कलकोट विधानसभा मतदारक्षेत्रात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व गाजवत दणदणीत विजय संपादन केला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर मतदारसंघातील राजकीय वातावरण ‘भाजपमय’ झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे उधाण आले आहे.विजयाचा गुलाल उधळल्यानंतर भाजपच्या सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी आपल्या नेत्याची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी सर्व विजयी उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले आणि त्यांच्या पुढील विकासकामांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.जनतेच्या विश्वासाचा हा कौल!या प्रसंगी बोलताना सचिन कल्याणशेट्टी म्हणाले की, “हा विजय म्हणजे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील जनतेने भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांवर आणि कामावर दाखवलेला मोठा विश्वास आहे. हा विजय केवळ उमेदवारांचा नसून प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा आणि मतदारांच्या प्रेमाचा आहे. आगामी काळात अधिक जोमाने विकासाची गंगा घराघरांत पोहोचवून जनतेने दिलेल्या या विश्वासाला आम्ही नक्कीच न्याय देऊ.”उत्साहात साजरा झाला विजयोत्सवनिकालाच्या घोषणेनंतर अक्कलकोटमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोठा जल्लोष साजरा केला.

ढोल-ताशांच्या गजरात आणि विजयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांनी ‘जनतेची सेवा हेच आमचे प्रथम कर्तव्य’ असल्याचे अधोरेखित केले.शेवटी, अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदार बंधू-भगिनींनी दिलेल्या या कौलाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, युवा कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











