Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

दयानंद महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विभागातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

Solapur Mirror by Solapur Mirror
March 17, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
दयानंद महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विभागातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर : दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन पी. एम. उषा योजनेअंतर्गत रसायनशास्त्र विभाग दयानंद महाविद्यालय सोलापूर तसेच रसायनशास्त्र संकुल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 व 10 मार्च 2026 रोजी करण्यात आली. ही परिषद मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच इन केमिस्ट्री 2026 या विषयावर आयोजित करण्यात आली.सदर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी परिषदेचे संयोजक डॉ एस वाय जाधव आणि डॉ ए घनवट यांनी परिषद आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला.परिषदेचे उद्घाटन प्राध्यापक एल बी दामा, प्रकुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी रसायनशास्त्राचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व विशद केले आणि रसायनशास्त्राची दुसऱ्या विषयांबरोबर सांगड घातल्यास जीवन समृद्ध होईल असे मत मांडले. प्राचार्य बी एच दामजी, दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर यांनी अशी परिषद ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. तसेच, प्राध्यापक व्ही. पी. उबाळे प्रशासक, दयानंद संस्था, सोलापूर यांनी परिषदेचे महत्त्व विशद केले. राष्ट्रीय परिषदेमध्ये विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पहिल्या दिवशी डॉ सिद्धनाथ भोसले, शास्त्रज्ञ, आयआयसीटी, हैदराबाद; डॉ. नंदकुमार पाटील, आर के फार्मा, वडोदरा; प्राध्यापक बापूराव शिंगटे, छत्रपती संभाजी नगर डॉ.एम के पाटील, धाराशिव; तसेच दुसऱ्या दिवशी प्रा. जे मंजन्ना, राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगावी, प्रा. व्यंकट रमण दोडी , केंद्रीय विद्यापीठ, कलबुर्गी, प्रा. देऊ भांगे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, डॉ. प्रकाश वडगावकर, शास्त्रज्ञ, एनसीएल पुणे यांनी अद्यावत संशोधनाचा आढावा घेऊन त्याचे भविष्यातील समस्या सोडवण्यासाठी होणारा उपयोग याबद्दल माहिती दिली.

त्यामुळे ही परिषद रसायनशास्त्रातील आधुनिक संशोधन, शाश्वत तंत्रज्ञान, हरित रसायनशास्त्र, औषधी रसायनशास्त्र आणि रसायनशास्त्राचा इतर विषयाशी संगम ह्या विषयावर विचार मंथन करणारी ठरली.सदर परिषदेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील 280 पेक्षा अधिक संशोधकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला. दोन दिवस चालत असलेल्या या परिषदेमध्ये विविध तांत्रिक सत्रे , व्याख्याने आणि संशोधकांचे सादरीकरण यामुळे वातावरण उत्साह पूर्ण होते. सदर सहभागी विद्यार्थ्यांमधून 25 विद्यार्थ्यांनी मौखिक सादरीकरणांमध्ये सहभाग नोंदवला तसेच 33 विद्यार्थ्यांनी पोस्टर सादरीकरणांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांमधून दहा विद्यार्थ्यांना मौखिक सादरीकरणासाठी पारितोषिके वितरित करण्यात आली, तसेच 13 विद्यार्थ्यांना पोस्टर सादरीकरणासाठी पारितोषिके वितरीत करण्यात आली.परिषदेच्या समारोपा प्रसंगी प्रा. प्रकाश महानवर, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. एस आर पुजारी यांनी करून दिली.आपल्या मार्गदर्शनामध्ये , आदरणीय कुलगुरूंनी रसायनशास्त्राच्या संशोधनाचे विविध किस्से, नवीन कल्पना व त्याचे समाज उपयोगी रूपांतरण कसे करता येईल याच्याबद्दल माहिती दिली आणि यामुळे समाजाचा चेहरा मोहरा नक्कीच बदलेल असा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रीय परिषदेचे संयोजक प्रा. एस वाय जाधव तसेच डॉ. ए ए घनवट यांनी दोन दिवसीय परिषदेचे सविस्तर विवेचन केले. समारोपाप्रसंगी अध्यक्षस्थानी प्रा. व्ही. पी. उबाळे प्रशासक दयानंद संस्था, सोलापूर यांनी विद्यापीठाविषयी कृतज्ञता व्यक्त करून विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले.

तसेच, दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. बी एच दामजी यांनी अशा अशा परिषदांचे आयोजन वारंवार झाल्यास संशोधन वृत्तीला चालना मिळेल असे मत व्यक्त केले. सदर परिषदेमध्ये सहभागी संशोधकांनी परिषदेबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या.सदर परिषदेअंतर्गत सूत्रसंचालन डॉ. आर जी गवळी यांनी केले असून डॉ. एस पी देशमुख यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले. राष्ट्रीय परिषद यशस्वी होण्यासाठी, श्री महाजन के जे, श्री ए एस बिराजदार, श्री वी आर शेकदार, ऋतुजा मोठे, सायली तूपसाखरे, वैष्णवी वनमाने, सीमा बीळूरे, अमर मैनाक, सुजय घोरपडे, रवींद्र पाटील इत्यादी शिक्षक; तसेच श्री आडकी श्री कविटकर श्री आळंदी श्री देगावकर श्री सरसंबे श्री डोंगरे, श्रीमती हिरेमठ आणि श्रीमती पाटील इत्यादी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे राष्ट्रीय परिषद यशस्वी झाली

Previous Post

दहा वर्षांची प्रतीक्षा संपली! सोलापूर जिल्हा परिषदेच्या तिजोरीत २० कोटी ४७ लाखांचा निधी जमा..

Next Post

सोलापूर झेडपी: फिल्डिंग लावली, आता फक्त निवडीची प्रतीक्षा!

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
सोलापूर झेडपी: फिल्डिंग लावली, आता फक्त निवडीची प्रतीक्षा!

सोलापूर झेडपी: फिल्डिंग लावली, आता फक्त निवडीची प्रतीक्षा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025