येरमाळा: श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र यात्रेतीलचुनखडी वेधण्याच्या सोहळ्याला चंदा भाविकांची अलोट गर्दी झाली, सुमारे १४ लाखांवर भाविक यात सहभागी झाल्याचा अंदाज पोलिसांचा आहे. प्रचंड गर्दीमुळे सोलापूर-धुळे महामार्गातरील वाहतूक विस्कळीत झाली. जवळपास पाच ते सहा तासांपर्यंत वाहने अममध्ये अडकून पडली होती. दरम्यान, लाखो भाविकांनी आई राजा उदो, उदी.. येडुसरीचा उदो उदी.. असा जयघोष करीत देवीच्या पालखीचे वर्शन घेतले
सकाळच्या धार्मिक विधीनंतर देवीची पालखी मिरवणुकीने चुन्याच्या रानातून आमराईतील मंदिरात आणण्यात आली. यावेळी भाविकांनी चुनखडी वेचून पालखीवर टाकत देवीचे दर्शन घेतले. राज्यभरातून जमलेल्या भाविकांनी हलगी, झांज, संबळाच्या तालातर ठेका धरलेला आगोजागी दिसून आले. शिवाय, प्रचंड जयघोषही सुरु होताच. यात्रेसाठी पोलिस प्रशासनाने विविध उपाय योजना आखून तगडा बंदोबस्त ठेवला होता. पालखी मुख्य मंदिरातून पोलिस प्रशासन, देवस्थान स्वयंसेवक, स्थानिक ग्रामसुरक्षा दलाच्या संरक्षण कन्चात निघाल्याने ती सुरक्षित पोहोचली. यावेळी आमपंचायतचे पदाधिकारी, देवस्थानचे पुजारी, मानकरी, खांदेकरी पालखी सोचत होते.



हेलिकॉप्टरच्या तीन प्रदक्षिणा, पुष्पवृष्टी; दरवर्षी अई येडेश्वरीच्या यात्रेतील पालखीवर आ. रागा जगजितसिंह पाटील यांच्यावतीने पुश्यपृष्ठों केली जाते. त्यानुसार यंदाही शुक्रवारी सकाळी १९. ३० वाजता परिसरात हेलिप्कॉटरने तीन प्रदक्षिणा घातल्या. लाखो भाविक या पुषवृष्ठी सोहळ्याचे साक्षीदार झाले. पुणवृष्ठीच्या हेलिकॉप्टरसाठी १० ते १२ लाख रुपये खर्च करण्यात आला..
यात्रेला निसर्गाशी जोडलेले आहे…; देवीला सृजनतेचे प्रतिक मानले जाते. त्यातून पालखी चुन्याच्या रानात आल्यानंतर चुना वेचून देवीला वाहण्याची परंपरा आहे. चुना वेचणे माणजेच एकप्रकारे भुमातेची पूजा आहे. वास्तविक पाहता ज्या भागात पाऊस कमी होतो. त्या भागात उन्हामुळे चुना वरती येतो, असे शास्त्र सांगते. इथे मात्र परंपरेचा एक भाग महणून फलखी आल्यानंतर चुना करती येतो, असे सांगितले जाते. ज्या पध्दतीने जयौर अन्न पिकको. सुजनतेचे प्राधिक म्हणून याला अशा उत्सकला निसर्गाशी जोडण्यात आले आहे
जेवण, नाश्ता, पाण्याची सोय…यात्रेत दानशूर भाविकांकडून तसेच काही संस्थांकडूनही यात्रेसाठी जमलेल्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी जागोजागी जेवण, नाश्ता, पाणी तसेच फळांची सोय करण्यात आली होती. तसेच ग्रामपंचायत, प्रशासनाकडूनही जागोजागी पाण्याचे टैंकर उभे करण्यात आले होते. यामुळे हॉटेल्सवर येणारा ताण मोठ्या प्रमाणात टळला.
पालखी मार्गावर फुले, रांगोळी…देवीच्या पालखीचे आमराई मंदिराकडे प्रस्थान होणार असल्याने स्थानिक भाविकात मोठा उत्साह होता. पालखीच्या स्वागतासाठी गावातील महिला भाविकांनी बाजारचौक, वाणीगल्ली, रोकडेश्वर मारुती मंदिर चौक, छत्रपती मार्केट, छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर मोठ-मोठ्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच फुलांच्या रांगोळीचीही सजावट केली होती.
५० कोटींची होते उलाढाल…येडेश्वरी देवीच्या यात्रेत भाविकांची संख्या लक्षणीय वाढल्याने व्यापारी, व्यावसायिकांची संख्याही वाहली आहे. संपूर्ण यात्रा कालावधीत हॉटेल्स, प्रसाद, मनोरंजनाची साधने, पाळणे व अन्य माध्यमांतून सरासरी ५० कोटींची उलाढाल होत असते,


नेटवर्क जॅम, पेमेंटही अडचणीत…येरमाळ्यात भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने गुरुवारी दुपारी २ वाजेपासून ते शुक्रबारच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोबाइल नेटवर्क जॅम झाले होते. परिणामी, ऑनलाइन खारेदी-विक्री व्यवहारही होण्यात मोठ्या अडचणी आल्या. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाही वृत्तसंकलनात अडचणी उद्भवल्या
१० तास : वाहनांच्या गर्दीमुळे सोलापूर-धुळे व खामगाव-पंढरपूर दोन्ही महामार्गाचर सुमारे १० तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडी झाली. रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करताना पोलिस्खंची दमछाक उडाली. दरम्यान, भाविकांनी पावसामुळे वाहने रानात रुततील या भीतीने सर्व्हिस रोडवर लावल्याने आणखीच कौडी इझाली.










