पंढरपूर,; येथील विठुरायाच्या दर्शनासाठी आलेला आंध्रप्रदेश येथील तरुण चंद्रभागा नदीमध्ये स्नानासाठी गेला होता. तेव्हा इस्काँन मंदिरा जवळ त्याला नदीपात्रातील खड्ड्याचा अंदाज न आल्याने गुरुवारी सकाळी (दि.३०) तो बुडाला आहे. त्याचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अवैध वाळू उपशाने तरुणाचा बळी घेतल्यामुळे भाविकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दिवसेंदिवस वाळूची टंचाई भासत असल्यामुळे वाळू तस्कर चंद्रभागा वाळवंट व नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैद्य वाळू उपसा करीत आहेत. गेल्या काही महिन्या पासून चंद्रभागा नदीमध्ये पुरेसे पाणी नसल्यामुळे नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा करण्यात आला आहे. यामुळे नदीपत्रात मोठे खड्डे पडले आहेत.सध्या उजनी धरणातून चंद्रभागा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. येथील कोळी समाज बांधव तसेच प्रशासनाकडून शोध मोहिम सुरु आहे मात्र दुपार पर्यंत बुडालेल्या तरुणाचा कुठेही ठावठिकाणा लागला नव्हता. दरम्यान आंध्र प्रदेश येथील तरुण भार्गव कटम हा गुरुवारी सकाळी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नानासाठी नातेवाईकासह गेला होता. मात्र खड्ड्याचा अंदाज न आल्याने तो नदीपात्रात बुडाला. त्याचा शोध घेण्यात येत आहे. अवैध वाळू उपशाने तरुणाचा बळी घेतला असल्यामुळे भाविकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आले


आपत्ती व्यवस्थापन टीम नाही
आपत्ती व्यवस्थापन चंद्रभागा नदीमध्ये पाणी आल्यानंतर भावी बुडू नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत टीम नगर परिषद व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांनी कार्यरत ठेवणे गरजेचे आहे. त्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र मंदिर समितीच्या उदासीन भूमिकेमुळे टीम कार्यरत ठेवण्यात आली नसल्यामुळे भाविकांचा नाहक बळी गेला, असा आरोप महर्षी वाल्मिक संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केला आहे.












