मंगळवेढा, ; – ब्रह्मपुरी येथील २५ वर्षीय रीलस्टार रोहिणी पाराध्ये हिच्या आत्महत्या प्रकरणाला १५ दिवस उलटूनही अद्याप तिला न्याय मिळाला नसल्यामुळे या प्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याचा संशय नागरिकामधून व्यक्त होत असून कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक व राष्ट्रीय महिला आयोग यांनी या प्रकरणात गांभीर्यपूर्वक लक्ष घालून या घटनेमागील गूढ जनतेसमोर उघड करून या प्रकरणाचा छडा लावावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
ब्रह्मपुरीची रीलस्टार रोहिणी पाराध्ये ही इन्स्टाग्रामवर प्रसिध्द होती. त्यामुळे तिचे हजारोच्या संख्येने फॉलोअर्स आहेत. २६ मे रोजी सोलापूर-मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गालगत ब्रह्मपुरी हद्दीत असलेल्या हॉटेल ग्रामपंचायतीमध्ये ओढणीीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेला पंधरा दिवस उलटूनही पोलिसांना जाऊन घटनेच्या मुळापर्यंत तपास करता न आल्यामुळे या आत्महत्येचे गूढ अद्यापही कायम आहे. मयत रोहिणी हिला शारीरिक व मानसिक त्रास दिल्यानेच तिने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

त्यानुसार गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना पोलीस मयत रोहिणीला का न्याय देत नाहीत? असा सवालही केला जात आहे. हिने रोहिणी गळफास घेतल्यानंतर हॉटेल मधील फरार झालेला कर्नाटकातील वस्ताद अखेर मंगळवेढा पोलिसात येऊन हजर झाला. त्याने घटनेनंतर आपला मोबाइल बंद करून ठेवला होता. त्यामुळे तो नेमका कोठे आहे याचा तपास पोलिसांना लागत नव्हता. वस्तादने आपल्या जबाबात मोबाइलचा रिचार्ज संपल्यामुळे मोबाइल बंद ठेवला होता. घटना घडल्यानंतर घरी कार्यक्रम असल्यामुळे तत्काळ निघून गेल्याची आश्चर्यकारक माहिती पोलिसांना दिली आहे. यापूर्वीच मयताच्या आई, वडिलाचे व पतीचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. गेली पंधरा दिवस मयतास अद्याप कोणताही न्याय मिळाला नसल्यामुळे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक यांनीच या प्रकरणात लक्ष घालून मृत रोहिणीस न्याय मिळवून दिल्यास तिला खरी श्रध्दांजली ठरणार असल्याच्या भावना सूज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.











