अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मुळे व स्वामी समर्थांच्या जागृत वास्तव्यामुळे अनेक भाविकांना स्वामींच्या कार्याची प्रचिती येत आहे. या प्रचितीमुळेच भाविकांचा कल स्वामी दर्शनाकडे नित्य वाढतच आहे. येथील वटवृक्ष मंदिरातील उत्कृष्ट व्यवस्थापन, नियोजनबद्ध दर्शनसेवा, विनम्रभावे आदरितिथ्य या सर्व आध्यात्मि क पैलूंमुळे अक्कलकोट तीर्थक्षेत्र हे आज मितीस सर्वो च्च स्थानावर आहे. या निमित्ताने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमुळे स्वामी समर्थांची कीर्ती सर्व दूर पसरली असल्याचे मनोगत महाराष्ट्र राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) चे महासंचालक संजीव सिंघल यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी संजीव सिंघल, सोलापूर अँटी करप्शनच्या चौगुले यांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी डीजी संजीव सिंघल बोलत होते.







