नवे रेल्वे अधिकारी मिश्रा यांची माहिती
सोलापूर : मरीआई चौकात असलेला शंभर वर्षांपूर्वीचा ब्रिटीशकालीन रेल्वे पूल रेल्वे प्रशासनाने पाडले असून, त्या ठिकाणी नवीन पूल बांधत येत असून डिसेंबर अखेरपर्यंत हा रेल्वे पूल पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाचे अधिकारी सुजित मिश्रा व अंशुमाली कुमार यांनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याला २४ हजार कोटी मिळाले आहेत. त्याचा फायदा निश्चित महाराष्ट रेल्वे प्रशासनाला होईल. सध्या एक लाख ७० हजार कोटीची कामे प्रगतीपथावर आहेत. राज्यातील १३२ रेल्वे स्टेशन हे अमृत स्टेशन स्कीममध्ये समाविष्ट करण्यात आलेले असूनया ठिकाणी सर्व सोईसुविधा पुरवण्यात येत आहेत.
राज्यातील रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणाकरिता ५ हजार ६७५ कोटीचा खर्च अपेक्षित आहे. सध्या १७ स्टेशनचे काम पूर्ण झालेले आहे. २०१४ पासून ट्रॅक कंट्रक्शनचे काम सुरू असून जवळपास २ हजार ४०० किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक हा पूर्ण तयार झाला आहे. १२२८ कोटीची कामे प्रगतीपथावर असल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले. सोलापुरातील मरीआई चौकातील मर्यादित क्षमतेच्या जुन्या रेल्वे पुलाच्या जागी नवीन रेल्वे पूल उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. हे काम नॅशनल महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे.










