सोलापूर : येथील चंद्रनील सोशल फाउंडेशनतर्फे ‘माझा शिवबा’ लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक चार्टर्ड अकाउंटंट सुशील बंदपट्टे यांनी पत्रकार परिषदेत दिली.ही स्पर्धा प्रत्येक परिवारासाठी आणि परिवारातील प्रत्येक घटकासाठी खुली ठेवण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नाचून नव्हे, तर वाचून आणि विचार करून साजरी व्हावी, असा स्पष्ट संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी पहिला गट इयत्ता ५ वी, ६ वी व ७ वी, दुसरा गट इयत्ता ८ वी, ९ वी व १० वी, खुला गट १० वी पुढील सर्व वयोगटांसाठी खुला असे तीन गट निश्चित करण्यात आले आहेत.

स्पर्धकांसाठी शिवाजी महाराजांचे बालपण, रवी सन्मान व शिवराय, शिवाजी महाराज आता असते तर… हे तीन विषय देण्यात आले आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व आकर्षक रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणारआहे. पहिल्या व दुसत्या गटासाठी प्रथम येणाऱ्या १० क्रमांकांना प्रत्येकी २५०० रुपये, द्वितीय २० क्रमांकांना १५०० रुपये, तर तृतीय ३० क्रमांकांना १००० रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. खुल्या गटासाठी प्रथम क्रमांकास ११ रुपये, द्वितीय ७ हजार रुपये व तृतीय ५ हजार रुपये अशी रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
लेख २० फेब्रुवारी पर्यंत पार्क चौक येथील गॅलक्सी स्पोर्ट्स, बाळीवेस येथील चंद्रनील सोशल फाउंडेशन कार्यालय, तसेच जुळे सोलापूर येथील सह्याद्री फूड्स अँड मिनरल वॉटर केंद्र या ठिकाणी द्यावे.
अधिक माहितीसाठी
चंद्रनील सोशल फाउंडेशन (मो. ९०२८०६३०३०),
विकास गोसावी (मो. ९८२२६६०१२१),
आसावरी गांधी (मो. ९९६०१०५०५१)
भोमीशा शहा (मो. ८७७९०८५८८६)
यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला विकास गोसावी, आसावरी गांधी व भोमीशा शहा आदी उपस्थित होते.











