बार्शी : बार्शी तालुक्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. महायुती सरकारच्या वतीने तर शेतकऱ्यांना शासनस्तरावर मदत होत आहे. परंतु शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिल्लक ठेवीपैकी रुपये १,००,००,००० (एक कोटी) चा धनादेश मुख्यमंत्री यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.

बार्शीतील अनेक समाजसेवी संस्था,डॉक्टर,उद्योजक, व्यापारी,विविध संघटना यांनी देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत केलेली आहे. बार्शी तालुक्याच्या वतीने विविध माध्यमांतून जमा झालेले आत्तापर्यंत रुपये १,२९,०३,२११ रकमेचे धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे सुपूर्द केले. अजून देखील विविध सामाजिक संघटना व बार्शीकर नागरीक मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये मदत करणार आहेत…!








