सोलापूर : संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी विनदायी असलेल्या नैऋत्य मोसमी ऱ्यांच्या (मॉन्सून) आगमनाची प्रतीक्षा प्रवकरच संपणार आहे. यंदाच्या मॉन्सून गामासाठी शनिवारपर्यंत (ता. १६) अंदमान- नेकोबार मोसमी वारे रुजू होण्याचा अंदाज गारतीय हवामान विभागाने (आयएमडी) तविला आहे.

देशाचे प्रवेशद्वार असलेल्या रळमध्येही मॉन्सूनचे आगमन कधी होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.मॉन्सूनच्या आगमनाच्या दीर्घकालीन वेळा लक्षात घेता साधारणतः २१ मे पर्यंत मॉन्सून अंदमानाची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोचतो. त्यापूर्वीच म्हणज े १५ ते २० मे दरम्यान दक्षिण अंदमान समुद्र, दक्षिण बंगालच्या उपसागरात डे रेदाखलहोतो. तर १ जूनपर्यंत मॉन्सून जोरदार पावसासह केरळच्या किनाऱ्यावर धडक देतो. मॉन्सूनच्या आगमनाचा सांगावा मिळाला असून, शनिवारी (ता. १६) दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे.

कमी दाबाचे क्षेत्र झाले ठळक; नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात मंगळवारी (ता. १२) कमी दाबाच े क्षेत्र तयार झाले आहे. बुधवारी (ता. १३) तीव्रता वाढल्याने हे कमी दाबाच े क्षेत्र ठळक झाले होते. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती होती. मध्य प्रदेशापासून मध्य महाराष्ट्र ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.











