सोलापूर : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काच्या एफआरपीची तब्बल २४६ कोटी १२ लाख रुपयांची थकबाकी अद्यापही अदा करण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे. गाळप हंगाम संपून चार महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असतानाही अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून कारखानदारांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
साखर आयुक्तालयाच्या नोंदीनुसार जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांकडे एफआरपीची मोठी रक्कम थकीत आहे. यापूर्वीही संबंधित कारखान्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेत कारवाईची प्रक्रिया वेगवान केली आहे जिल्ह्यातील हजारो शेतकरी ऊस शेतीवर अवलंबून आहेत. ऊस तोडणी, वाहतूक, मजुरी, खत, बियाणे आणि सिंचन यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करून शेतकरी ऊस उत्पादन घेतात. मात्र हंगाम संपल्यानंतरही एफआरपीची रक्कम वेळेत मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. बँकांचे कर्ज, पतसंस्थांचे हप्ते आणि आगामी खरीप हंगामासाठी लागणारा खर्च यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
दरम्यान, काही कारखान्यांनी थकबाकीची अंशतः रक्कम अदा केल्याचा दावा केला असला तरी अद्याप कोट्यवधी रुपयांची देणी बाकी आहेत. प्रशासनाच्या कारवाईनंतर उर्वरित रक्कम तातडीने अदा होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. अन्यथा शेतकरी संघटनांकडून आंदोलनाचा इशाराही देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर नेमकी कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आ