सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या कंत्राटी आणि सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये सोलापूर शहरातील स्थानिक, पात्र आणि गरजू बेरोजगार युवक-युवतींना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशी आग्रही मागणी माजी नगरसेवक दीपक विजय जमादार यांनी महापालिका आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली आहे. महानगरपालिकेत वेळोवेळी विविध प्रशासकीय, तांत्रिक व इतर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाते. मात्र, या प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांना अपेक्षित प्रमाणात संधी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर दीपक जमादार यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.


- मनपाच्या सर्व कंत्राटी भरती प्रक्रियेत सोलापूरच्या स्थानिक उमेदवारांनाच पहिले प्राधान्य द्यावे. सरळ सेवा भरतीमध्येही स्थानिक रहिवाशांसाठी विशेष धोरण निश्चित करून त्यांना संधी उपलब्ध करून द्यावी. भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि स्थानिक उमेदवारांना न्याय देण्यासाठी स्पष्ट ‘गाईडलाईन्स’ तयार करून त्या सर्व विभागांना लागू कराव्यात. सोलापूर शहरातील बेरोजगारांची नोंद घेण्यासाठी एक स्वतंत्र डेटाबेस तयार करावा, जेणेकरून भरतीवेळी त्याचा उपयोग होईल. जर एखाद्या कंत्राटी पदावर बाहेरील उमेदवाराची नियुक्ती करायची असेल, तर ‘स्थानिक उमेदवार उपलब्ध नाही’ असे कारण नोंदवणे बंधनकारक करावे. अशी आग्रही मागणी माजी नगरसेवक दीपक विजय जमादार यांनी महापालिका आयुक्तांकडे केले आहे .
- राज्य कामगार विमा रुग्णालयात दररोज हजारो कामगार रुग्ण उपचारासाठी येतात. अशा उद्धट डॉक्टरांमुळे रुग्णालयाची प्रतिमा मलिन होत आहे. तरी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित डॉक्टर देशपांडे यांची पुढील ७ दिवसांच्या आत येथून बदली (उचलबांगडी) करण्यात यावी. जर या तक्रारीची योग्य दखल घेऊन कार्यवाही न झाल्यास, आम्हाला कामगार संघटनेच्या माध्यमातून उपोषण आणि जनआंदोलन छेडावे लागेल. त्यानंतर होणाऱ्या परिणामांना प्रशासन आणि संबंधित डॉक्टर पूर्णपणे जबाबदार राहतील. असेही ते सांगतले आहे










